महाराष्ट्रशेती

कृषि संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा जाहीर–फक्त या जिल्ह्यांचा समावेश

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्याला मान्यता

{ केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड महाराष्ट्र }

नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार  

दिनांक 10.10. 2024 जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या संभाजीनगर बीडजालनापरभणीधाराशीवलातूरनांदेडहिंगोलीअमरावतीअकोलावाशिमयवतमाळबुलढाणावर्धाजळगाव व नाशिक या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूरभंडारागोंदियाचंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित सहा हजार कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे.

            प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण ६९५९ गावांच्या यादीस  मान्यता देण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा दोनसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापन करण्यात आली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!