
3 जागीच ठार 2 जनांची प्रकृती चिंताजनक तर 20 प्रवाशी गंभीर जखमी ! कडा-आष्टी जवळ भिषण अपघात
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे बीड कडा-आष्टी : धामणगाव कडून कडा येथे येत असलेल्या महिंद्रा पिकप या वाहणाचा अपघात होऊन तीन जण जागीच मृत्युमुखी पडले तर सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहनाचे टायर फुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
धामणगाव येथून जवळच असलेल्या वंजारवाडी या गावातील मजूर धामणगाव मार्गे कडा येथे कांदा भरण्यासाठी येत असताना महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन देवी निमगाव जवळ रस्त्याच्या खाली जाऊन धडकले यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुमारे 20 जन जखमी झाले आहेत.
जखमींना तात्काअहिल्यानग येथे तर काही जखमींना कडा येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताची घटना आज दिनांक १ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर घडली.
सदरील दुर्घटनेत 1 श्रावणी विक्रम महाजन वय १४- 2 ऋतुजा सतीश महाजन वय १६, व 3-अजित विठ्ठल महाजन वय १४
वरील एकाच परीवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आसुण दोघांची प्रकृती गंभीर आहे जख्मीनां उपचारासाठी अहिल्यानगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
उर्वरित जखमींवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.