आरोग्यबीड

आवकाळीच्या तडाक्यात शेतकऱ्याचा मृत्यु

आवक्यु तडाक्यात अभिमन्यु चा अंत ! कुटुंब आले संकटात

वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दि 6 /5/2025 वडवणी — अवकाळी वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटा मध्ये बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातील तरुणाचा दुर्दैवी दुर्घटनेतील विजेच्या चक्रव्यूहात अभिमन्यु सापडला आणि यातच त्याचा प्राण गेला  ..

काल 4 वाजण्याच्या सुमारास बीड जिल्ह्यत विविध भागात वादळ वाऱ्यासह पाऊस कोसळला काही ठिकाणी गारपीट झाली आसुण फळबागायत आणि जिरायत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे

या बरोबरच विजांचा कडकडाट देखील काणटाळ्या बसवत होत्या त्यातच अचानक वीज पडल्याने वडवणी येथील शेतकऱ्याचा करुण अंत झाला

रा.ढोरवाडी ता.वडवणी येथील अभिमन्यु पांडुरंग नलभे वय 35 यांचे काल सायंकाळच्या सुमारास शेतात काम करत असताना वीज पडल्यामुळे दुःखद निधन झाल्याचे कळते आहे.. त्यांच्या पश्चात 4 मुली ज्यामध्ये एक मतिमंद व 1 मुला सह पत्नी आसा परिवार आसल्याची प्राथमिक माहिती आहे

कुटुंबातील प्रमुख कर्ता धर्ता माणूस अचानक कायमचा गेल्याने कुटुंब उघडल्यावर पडले आसुण प्रशासणाने अभिमन्यु नलभे च्या कुटुंबास तात्काळ आपात्कालीन निधी उपलब्ध करुन आर्थिक मदत करावी…..

✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 WEGWAN MARATHI NEWS NETWORK 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!